रत्नागिरी : जिल्ह्यात शिक्षक भरतीसाठी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रिक्त पदांसाठी शासनस्तरावरून निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीत गेल्या ३ दिवसात ३०१ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्णत्वास गेल्याचे सांगण्यात आले. शिक्षक भरती प्रक्रियेला प्रारंभ झालेला असताना मुलाखतीशिवाय असणाऱ्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी मंगळवारपासून सुरू झाली आहे. या प्रकियेत २१ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे पडताळणी होणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेजवळील लोकनेते कै. शामराव पेजे सभागृहात या प्रक्रियेवेळी ३०१ उमेदवारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात १ ते ५ साठी ४५४ जागा तर ६ ते ८ साठी २०५ जागांवर भरती केली जाणार आहे.