रत्नागिरीतून उदय सामंत प्रचंड मताधिक्याने विजयी

0

रत्नागिरी : निकालाची औपचारिकता बाकी राहिलेल्या रत्नागिरी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार उदय सामंत हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. या निवडणुकीत उदय सामंत यांना ११८४८१ मते तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश मयेकर यांना ३१०१८ मते मिळाली. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच प्रत्येक फेरीत उदय सामंत यांना आघाडी मिळाली. हि आघाडी वाढत जाऊन तब्बल ८७४६३ मतांचे मताधिक्य महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांना मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here