भाजप बळकट करण्यासाठी संघटनेचा पाया बळकट व्हावा यासाठी दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. बुधवारी अॅड. दीपक पटवर्धन यांची दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून एकमतांनी निवड झाली. परंतु सद्यःस्थितीत उत्तर रत्नागिरीची जबाबदारीही अॅड. पटवर्धन यांच्याकडेच देण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे खासदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी मनोज कोटक यांनी आज येथे दिली. भाजप जिल्हाध्यक्ष निवडणूक प्रक्रिया बुधवारी पार पडली. यावेळी आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, प्रशांत शिरगावकर आदी उपस्थित होते.