राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा आजपासून सुरु आहे. राज्यभरातून तब्बल 15 लाख विद्यार्थी बारावीची परिक्षेसाठी बसले आहेत. 18 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत घेतली जाणार आहे. पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, मुंबई, औरंगाबाद, लातूर, अमरावती आणि कोकण या 9 विभागीय मंडळातून 15 लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत.