मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली यानंतर त्यांनी सीएए कायद्यावरुन लोकांना जास्त घाबरण्याचं कारण नाही असं जाहीर वक्तव्य केलं होतं. मात्र राज्यात एकत्र सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने या विधानावर आक्षेप घेतला. त्यामुळे सीएएवरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीही उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेत सीएएबाबत त्यांनी जाहीरपणे समर्थन करु नये असं म्हटलंय, त्यांना कुणीतरी समजवावं लागेल, मला संधी मिळाल्यास मी समजावेन असं भाष्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय.