न्या. मुरलीधर यांच्या तडकाफडकी बदलीमुळे शिवसेनेचे ‘सामना’तून केंद्र सरकारवर टीकास्त्र

0

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकारने न्यायालयाने व्यक्त केलेले ‘सत्य’ मारले, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. भडकाऊ भाषणांचे भांडवल आणि त्यांचा बाजार जोरात आहे. केंद्रातले एक मंत्री अनुराग ठाकूर, खासदार परवेश वर्मा व कपिल मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आता दिल्ली हायकोर्टाने दिले. ज्यांनी हे आदेश दिले त्या न्यायमूर्तींनाच सरकारने शिक्षा ठोठावली, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here