रत्नागिरी जिल्हा परिषदचे २५ वे वार्षिक संमेलनाला सुरुवात झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनावर मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी पाठ फिरवल्याने जि.प. भवनात उलटसुलट चर्चा सुरू होती. कप्तानच गैरहजर राहिल्याने नाराजीचे सूर उमटत होते.