करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, या निर्णयासोबतच राज्यातील ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला सूचना देण्यात आल्याची माहिती मंत्री राजेश टोपे यांनी दिली.