शासकीय कार्यालयांना सुट्टी नाही ;रेल्वे बस सुरू राहणार

0

मुंबई : राज्यात कोरोना पॉझिटिव्ह ४१ रुग्ण असून, एका वृध्द रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. उर्वरित ४० पैकी ७ रुग्णांमध्ये कमी तीव्रतेची लक्षणे असून, एक रुग्ण गंभीर आहे. तर ३२ जणांमध्ये लक्षणे आढळलेली नाहीत.रुग्णांमध्ये २८ पुरुष असून १३ स्त्रिया आहेत.सार्वजनिक वाहतूकीसह,मंत्रालयासह शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार नाहीत असे स्पष्ट करतानाच,परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून याविषयी योग्य तो निर्णय वेळोवेळी घेण्यात येईल असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून राज्यातील परिस्थितीची माहिती दिली.राज्यात कोरोना पॉझिटिव्ह ४१ रुग्ण असून, एका वृध्द रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. उर्वरित ४० पैकी ७ रुग्णांमध्ये कमी तीव्रतेची लक्षणे असून, एक रुग्ण गंभीर आहे. तर ३२ जणांमध्ये लक्षणे आढळलेली नाहीत.रुग्णांमध्ये २८ पुरुष असून १३ स्त्रिया आहेत.मात्र मंत्रालयासह राज्यातील कोणतीही शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.सध्या अत्यावश्यक नसलेल्या सेवांना शासनाने मर्यादित स्वरुपात काम करण्यास सांगितले आहे. मुंबई शहरातील विशेषत: क्रॉफर्ड मार्केट परिसरातील पक्षी व प्राण्यांशी संबंधित दुकाने संसर्गाचा धोका गृहित धरुन बंद करण्यात येतील. मात्र भाजीपाला दुकाने सुरुच राहतील असेही त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन प्रभावी उपाययोजना करीत असून खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होम कार्यपद्धती मान्य करण्यात आली आहे. रेल्वे, बसेस ही सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात येणार नाही. मात्र, आवश्यक असेल तेव्हाच नागरीकांनी प्रवास करण्याचे आवाहन यावेळी मुख्य़मंत्र्यांनी केले. परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात असून आवश्यकता भासल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.औषधे, बँका,संस्थांचे व्यवस्थापन प्रमुख आणि आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी देखील संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. कंपन्यांच्या सीएसआर फंडातून औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेन्टीलेटर पुरविणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.गरज असल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता गर्दी कमी करणे हा प्रभावी उपाय असून त्यासाठी आवश्यक तेवढा प्रवास करावा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

खासगी व्यतिरिक्त इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयातून नियमित काम सुरुच राहणार आहे. मात्र,या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आरोग्याची पुरेशी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सध्या परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळ आणि बंदरांवर कसून तपासणी सुरु असून विलगीकरणाची व्यवस्था देखील पुरेशी आहे.प्रसंगी शहरातील मोठ्या हॉटेल्स मध्ये कमी दरात विलगीकरण सुविधाही देण्यात आली आहे.कोरोनाच्या रुग्णावर खासगी रुग्णालयात देखील उपचार करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा-अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.राज्यात लागू असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात.जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे. त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी,केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here