दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधूनही डेबिट कार्डच्या सहाय्याने तीन महिने पैसे काढण्यावर लावला जाणारा सरचार्ज रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली. बचत खात्यावर असणारी किमान रकमेची अटही तीन महिन्यासाठी त्यांनी शिथील केली. कोरोनाच्या बाधेमुळे कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांमुळे नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात, या हेतूने ही पावले टाकण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
04:27 PM 24/Mar/2020