स्थलांतरित कामगारांसाठी ठाकरे सरकारने उभारली निवारा केंद्र

0

कोरोनाचा फटका कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. कोरोनाच्या भीतीने परराज्यातले कामगार जे महाराष्ट्रात कामानिमित्त व्यास्तव्याला होते ते आता त्यांच्या राज्यात जाऊ लागले आहे. मात्र लॉकडाऊन असल्याने त्यांना वाहनांविना किंबहुना पायी चालत जावं लागत आहे. अशा ७० हजार कामगारांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या सगळ्या कामगारांसाठी २६२ निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांनी सरकारने तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या निवारा केंद्रामध्ये रहावं, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यामध्ये स्थलांतरिक कामगार, बेघर लोक राहू शकतात. त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:35 PM 30-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here