राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना बडतर्फे करावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाण्यातील तरुणाला रात्री अपरात्री घरातून उचलून त्याला गुंडांकरवी मारहाण केल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी लक्ष घालत आव्हाडांना तात्काळ मंत्रीपदावरून बडतर्फ करावे, सामान्य जनतेविरोधात अशाप्रकारे वर्तन करणाऱ्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.