मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांपासून बाराबलुतेदारांवर मोठं आर्थिक संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. इतर राज्यांनीही त्या त्या राज्यात आर्थिक पॅकेज दिलं आहे. महाराष्ट्र सरकारने अद्याप कोणतंही पॅकेज जाहीर केलेलं नाही. त्यामुळे केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींऐवजी राज्य सरकारलाही एखादं पत्र लिहून मदतीची मागणी करावी, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.