रत्नागिरी : येणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात कुठेही पाणी साचू नये यासाठी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला उप नगराध्यक्ष रोशन फाळके, आरोग्य सभापती राजन शेट्ये, पाणी सभापती विकास पाटील, नगरसेवक निमेश नायर, बंटी किर आदी उपस्थित होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या सूचना नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिल्या. तसेच शहरातील स्वच्छते संदर्भात व डास फवारणी संदर्भातील कामांचे नियोजन यावेळी करण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:45 PM 01-Jun-20