संगमेश्वर : चक्रीवादळामुळे झालेल्या पावसात मुर्शी गावातील आठ वाड्यांना पाणीपुरवठा करणारी विहीर विद्युत पंपासह कोसळली. त्यामुळे ऐन पावसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर उभा राहिला. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते जयाशेठ माने यांनी घटनास्थळी भेट देऊन दुसऱ्या सार्वजनिक विहिरीवरून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. श्री. माने यांनी याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पर्यायी व्यवस्था करण्याची कार्यवाही सुरू झाली असून लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल. जयाशेठ माने यांनी विशेष लक्ष देऊन पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून जयाशेठ माने यांचे आभार मानण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:43 AM 06-Jun-20