मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला आहे. काल, शुक्रवारी एकूण 3493 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 141 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल एकूण 1718 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर कालपर्यंत एकूण 47 हजार 796 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 127 जणांच्या मृत्यूची नोंद होऊन एकूण मृतांचा आकडा 3717 इतका झाला आहे. तर सध्या 49 हजार 616 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:53 AM 13-Jun-20