नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणू झपाट्याने वाढतच आहे. त्यातही गेल्या 24 तासात तब्बल 445 बळींची नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत 14,821 ने वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 26 हजार 910 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 37 हजार 252 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 55.77 टक्के आहे. तर 1,74,387 अॅक्टिव्ह केसेस आहेत. गेल्या 24 तासांत 9 हजार 440 रुग्ण बरे झाले आहेत. तर देशातील एकूण मृतांची संख्या 13,699 वर पोहोचली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:10 PM 22-Jun-20