नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश

रत्नागिरी : कोरोनाविषयक संचारबंदी शिथिल झाली असली, तरी त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यांचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. काही व्यवसाय अटी घालून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर काही व्यवसाय सुरू करू नयेत, असेही आदेश आहेत. त्यांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे जयगड येथील प्रकारावरून उघड झाले आहे. त्यामुळे रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकामार्फत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सलून व्यवसाय आणि पार्लर तसेच हॉटेलवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:57 PM 23-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here