मुंबई : इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आता भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘तुम्ही काही वर्षांपूर्वी इंधन दरवाढीवरून अनेक ट्विट केले आहेत. आता तुमच्याच सरकारने ऐतिहासिक इंधन दरवाढ केली आहे. मला वाटतं हे तुम्हाला आठवत असेलच. तुम्हाला नक्कीच स्मृतीभ्रंश झाला नसावा’, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी ईराणी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने इंधनाचे दर प्रचंड वाढवले आहेत. देशात ऐतिहासिक इंधन दरवाढ झाली आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण या ऐतिहासिक इंधन दरवाढीवर आता तुम्ही काय ट्विट कराल? असा खोचक सवालही आव्हाड यांनी केला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:12 PM 26-Jun-20