रत्नागिरी : कोरोनाप्रतिबंधासाठी येत्या १ ते ८ जुलै या कालावधीत जिल्ह्यात मिशन ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत प्रवाशांना बाहेर जिल्ह्यातून रत्नागिरीत जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यात येणारा महाड विन्हेरे नातूनगर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वैद्यकीय अतिआवश्यकतेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात पास घेऊन प्रवेश करणाऱ्यांनी तसेच अत्यावश्यक वाहतुकीसाठी कशेडी घाट मार्ग वापरावा, असे प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:02 AM 30-Jun-20