राजापुरातील मेडिकल दुकाने सायंकाळ ५ नंतर बंद

राजापूर : सक्षम कर्मचारी वर्ग सायंकाळी पाचनंतर उपलब्ध होत नसल्याने राजापुरातील औषध दुकाने त्यानंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून अत्यावश्यक सेवा म्हणून पाचनंतर काही ठराविक मेडिकल दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती राजापूर तालुका केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एजाज पन्हळेकर यांनी दिली. शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे इतर व्यवसायिकांना बरोबरच औषध विक्रेत्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत राजापूर तालुका केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सभासद आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा देत आहेत तर काही वृद्ध लोकांना घरपोच सेवा देत आहेत. मात्र, आताच्या लॉकडाऊनमध्ये सायंकाळी ५ नंतर सक्षम कर्मचारी वर्ग मेडिकल दुकानात उपलब्ध होत नाही. त्यामुळे सायंकाळी ५ नंतर मेडिकल दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पन्हळेकर यांनी सांगितले. तसेच जे औषध दुकानदार आपली दुकाने सायंकाळी पाचनंतर सुरू ठेऊ इच्छितात त्यांना मुभा देण्यात आल्याचेही पन्हळेकर यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:25 AM 04-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here