खेड : रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेले ‘ऑपरेशन ब्रेक द चेन’ अभियान दि. ८ जुलै रोजी संपल्यावरही कशेडी घाट येथून विनापरवाना प्रवासी वाहतुकीला परवानगी असणार नाही, अशी माहिती खेडचे उपविभागीय अधिकारी अविषकुमार सोनोने यांनी सोमवारी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी दि १ ते ८ जुलै या कालावधीत ‘ऑपरेशन ब्रेक द चेन’ हे अभियान लोक सहभाग घेऊन राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्याच्या सीमा देखील ये-जा करण्यासाठी बंद करण्यात आल्या आहेत. सोनोने यांनी सांगितले की, आंतरजिल्हा वाहतूक अद्यापही बंधनमुक्त केलेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यात येऊ इच्छीणाऱ्यांनी पास घेऊनच यावे अन्यथा कशेडी येथील तपासणी नाक्यावर प्रवेश मिळणार नाही. कशेडी येथून परवानगी नसल्यास आपल्याला परत जावे लागू शकते, याची नोंद घ्यावी असे श्री. सोनोने यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:18 AM 07-Jul-20