राजापुर : शहरालगतच्या कोंढतड गाडगीळवाडी येथे सोमवारी वीजवाहिन्यांसह खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, एक खांब गाडीवर पडल्याने गाडीचे काहीअंशी नुकसान झाले आहे. गाडगीळवाडी येथील जीर्ण वीजखांब बदलावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत होती. मात्र महावितरणने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. अशातच सोमवारी वीजवाहिनीवर फांदी पडल्याने जीर्ण खांब तुटून वाहिन्याही तुटल्याने तीन ते चार खांब वाकले आहेत. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, चारचाकीवर खांब पडल्याने नुकसान झाले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:07 PM 08-Jul-20