मुंबई : देशासह महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यावर ठाम आहे. परंतु, यूजीसीने सप्टेंबरपासून परवानगी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेनेनं थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. देशातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिवसेना नेते व मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने यूजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे, अशी माहिती युवासेनेचे सचिव वरुन सरदेसाई यांनी सांगितलं आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:39 PM 18-Jul-20