वस्तुस्थितीचे भान ठेऊन गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना आणण्याचा निर्णय घेतला पाहिजे : खा. विनायक राऊत

0

रत्नागिरी : सध्या स्थानिक पातळीवर कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव होत आहे. लाखोंच्या संखेने या आधी चाकरमानी आले आहेत. पण गणेशोत्सवासाठी भावनेच्या आधारावर निर्णय घेऊन चालणार नाही तर वस्तुस्थीचे भान ठेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. जेणेकरून येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वास्थ आणि येथील स्थानिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही या दोन्ही गोष्टींचे भान ठेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे असे मत रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
04:35 PM 29/Jul/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here