मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत 427 विमानांनी आतापर्यंत मुंबईत 58 हजार 233 प्रवासी आले असून यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 19 हजार 638 आहे. आलेल्या एकूण प्रवाशांमध्ये उर्वरित महाराष्ट्रातील 19 हजार 817 प्रवासी असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 18 हजार 778 इतकी आहे. ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत आणखी 46 विमानांनी प्रवाशी मुंबईत येणे अपेक्षित आहे. कोरोना विषाणुविरुद्ध शासन निग्रहाने लढत असतांना परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना कॉरंटाईन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:09 PM 06-Aug-20