ठाकरे कुटुंबातील कुणी असं करणार नाही; मनसेकडून आदित्य यांची पाठराखण

0

मुंबई : ठाकरे कुटुंबातील कुणी व्यक्ती असं काही करणार नाही, असं सांगत मनसेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेतेबाळा नांदगावकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली. ठाकरे घराण्यातील व्यक्तीचा अशा प्रकारच्या घटनेत सहभाग असेल असं मला वाटत नाही. भाजपच्या आरोपामुळेच हा वाद सुरू झाला आहे. सुशांतप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सर्वांनीच केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेलं आहे. त्यामुळे चौकशी होत असल्याने त्यातून सत्य बाहेर येईल, असं बाळ नांदगावकर यांनी सांगितलं.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:18 PM 14-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here