रत्नागिरी : कोकणरेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवानंतर किमान तुतारी एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर कोकण रेल्वेच्या मार्गावरील गणपती स्पेशल ट्रेन बंद होतील यानंतर तुतारी एक्सप्रेस ट्रेन सुरू करावी अशी मागणी आहे. मार्च च्या मध्यानंतर कोविड चा प्रादुर्भाव झाल्या नंतर देशभरातील रेल्वे सेवा ठप्प झाली.ट्रेन बंद झाल्याने कोकणचा मुंबईशी जणू संपर्कच तुटला.पाच महिने झाले तरी मुंबई कोकणाला जोडणारा महत्वाचा दुवा असलेली कोकण रेल्वे बंद असल्याने चाकरमान्याचे मोठे हाल झाले.याचा फटका मोठ्या प्रमाणावर मुंबई शी जोडलेल्या कोकणातील व्यावसायिकांना हि बसला.याच दरम्यान गणेशोत्सवासाठी कोकणात गणपती स्पेशल सूरु करण्यात आल्या असल्या तरी यासर्व गाड्या गणेशोत्सवानंतर बंद होतील आणि कोकणच्या ग्रामीण भागाचा मुंबई शी संपर्क तुटेल. मुंबईतुन कोकणात जाण्यासाठी आणि मुंबईत येण्यासाठी दिवसा ला किमान एक ट्रेन असावी अशी मागणी होत आहे.पहिल्या टप्यात तुतारी सुरू करून मग टप्याटप्याने पुढील गाडी सुरू कराव्यात अशी मागणी जोर धरत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:04 PM 26-Aug-20