जाखडी, भजन कलाकारांसोबत ना. उदय सामंत साधणार संवाद

0

रत्नागिरी : लॉक डाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांची जीवन उध्वस्त झाली. कोकणातील जाखडी, भजन कलाकार देखील यातून सुटले नाहीत. रत्नागिरी तालुक्यातील या कलाकारांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी ना. उदय सामंत उद्या दुपारी 3 वाजता या कलाकारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधणार आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ज्या जाखडी आणि भजन कलाकारांना आपल्या अडचणी ना. उदय सामंत यांच्याकडे मांडायच्या आहेत त्यांनी रत्नागिरी खबरदार च्या 9421187576 या क्रमांकावर संपर्क साधावा.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
8:03 PM 31-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here