मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. परीक्षांच्या आयोजनासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. परीक्षा कधी व कशा पद्धतीने घेतल्या जातील याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना उदय सामंत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “विद्यार्थ्यांना कमीत कमी त्रास होईल, अशा पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी राज्यपालांनी देखील सकारात्मक भूमिका दाखवली आहे. विद्यार्थ्यांना फार त्रास न होता परीक्षा घेतल्या जाव्यात, असे राज्यपालांचे देखील मत आहे”, असे उदय सामंत म्हणाले. प्रत्येक कुलगुरूंनी मांडलेल्या भूमिकेविषयी राज्यपालांना यावेळी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे एकंदर आजची चर्चा सकारात्मक झाली असल्याचे उदय सामंत म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
4:54 PM 02-Sep-20