गुहागर : महसूल खात्याची कोणत्याही प्रकारची वाळू उत्खनन व वाहतुकीबाबत परवानगी न घेता गेले अनेक दिवस मध्यरात्रीनंतर पालशेत आंबोशी बंदराच्या मुखाजवळ बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे. याविरोधात सागरी सीमा मंचने आवाज उठवला असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत वेळोवेळी प्रशासनास माहिती दिली आहे. मात्र अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तरीही बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याने आंदोलन करण्याचा इशारा सागरी सीमा मंचने दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:05 PM 14-Sep-20