कणकवलीत २० सप्टेंबरपासून आठ दिवस जनता कर्फ्यू

0

कणकवली : कणकवली शहरात वाढणारा कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता २० ते २७ सप्टेंबर या कालावधीत कडक जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या सभेत घेण्यात आला आहे. या कालावधीत शहर १०० टक्के बंद रहाणार आहे. कणकवली नगरवाचनालय सभागृहात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली जनता कर्फ्यूबाबत निर्णय घेण्यासाठी ही सभा झाली.यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, नगरसेवक अभिजित मुसळे,मेघा गांगण,सुशांत नाईक,पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे,व्यापारी मंदार आळवे,नंदू उबाळे,राजू पारकर,महेश नार्वेकर, विलास कोरगावकर, अँड.दीपक अंधारी व अन्य नागरिक उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:26 PM 17-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here