रत्नागिरी : काल रात्री ९ वाजल्याच्या सुमारास शहरात ढगफुटी सदृश्य पाउस पडला. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. शहराची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गोखले नाका, मारुती आळी या भागात जवळजवळ गुडगाभर पाणी साचले. बाजारपेठेतील काही दुकानातून पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. शहरात नळपाणी योजनेचे काम देखील सुरु आहे. यासाठी करण्यात आलेल्या खोदाईमुळे देखील अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा झाला नाही. कधी नव्हे ते शहरातील मारुती मंदिर भागातील के सी जैन नगर समोरील रस्त्यावर देखील पाणी साचून नदीचे स्वरूप आले होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:06 AM 22/Sep/2020