रत्नागिरी : मेर्वी परिसरात बिबट्याने चौघांवर हल्ला केल्यानंतर वन विभागाने त्याला पकडण्यासाठी कॅमेरे आणि पिंजरे लावले आहेत. मात्र, बारा दिवसांच्या या विशेष प्रयत्नांना बिबट्याने हुलकावणी दिली असून वन विभागाच्या सापळ्यांकडे बिबट्या फिरकलाच नाही. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग अनेक प्रयत्न करत आहे. मात्र, बिबट्या आपला मार्ग बदलून अन्य भागातून फिरत असल्याचे दिसत आहे. सध्या पावस, नाखरे आदी भागात बिबट्याचा संचार सुरू आहे. त्यामुळे वन विभाग अनेक ठिकाणी पिंजरे लावून त्यात त्याला पकडण्याकरिता प्रयत्नशील आहे. परंतु अद्यापही त्या पिंजऱ्यात असलेल्या भक्ष्याकडे दुर्लक्षित करून तो वन विभागाला हुलकावणी देत आहे. वन विभागातर्फे नागरिकांना ध्वनिक्षेपकावरून सूचना दिल्या जात आहेत. पंचक्रोशीत रस्त्याशेजारी फलक लावून जागृती होत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:21 AM 28-Sep-20