तालुक्यातील पीक नुकसानीचे पंचनामे निवळी येथून सुरू

0

रत्नागिरी : परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सध्या सुरु आहेत. तालुका स्तरावरून निवळी येथून भात आणि नाचणी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू मंगळवारी सुरू झाले. ग्रामसेवक श्री. कुंभार, कृषी सेवक नितीन रंजून यांनी पंचनामे केले. यावेळी पंचायत समिती सदस्य सौ. साक्षी रावणंग, निवळी सरपंच सौ. वेदिका रावणंग, उपसरपंच विलास गावडे, ग्रामपंचायत सदस्य विनायक रावणंग, सौ. वर्षा रावणंग, पोलीस पाटील भालचंद्र शितप शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर उपस्थित होते. काही ठिकाणी कापलेल्या भाताला कोंब आले आहेत, तर अनेक ठिकाणी भातपिके आडवी झाली आहेत. नुकसानीबाबत सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे काम तालुकाभर सुरू आहे. हे पंचनामे तालुका स्तरावरून ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक व अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन केले जात आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भात किंवा नाचणीचे पीक हाताला आले तेवढे घरी नेले. त्यामुळे प्रत्यक्ष पंचनामे झाले नाहीत, तर आधार कार्ड, बँक पासबुक व सातबारा उतारा झेरॉक्स, नुकसानीचे फोटो ही माहिती घेऊन ग्रामसेवक, तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पंचायत समिती सदस्य सौ. साक्षी रावणंग यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:21 AM 21-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here