मुंबई : ‘राज्य मंत्रिमंडळाच्या तीन बैठका झाल्या आहे. त्यातील एका बैठकीतही निर्णय घेतला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केले आहे. ‘अजित पवारांनी अद्याप काय केलं? सरकारी खजिना फक्त मराठा समाजासाठी वापरला जात आहे. त्यांनी एका रात्री 8 कोटी रुपये पास केले आणि ओबीसीबाबत मात्र दुजाभाव केला. त्यामुळे आम्ही तुमचा राजीनामा मागितला तर काही वावगं ठरणार नाही,’ असे प्रकाश शेंडगे म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:20 PM 05-Nov-20