रत्नागिरी : गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची कोंडी झाली असून त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी समविचारी मंचाने केली आहे. शालेय विद्यार्थी वाहतूक करून उपजीविका करणाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला. जिल्ह्यातील अनेकांना याचा फटका बसल्याने या वर्गाची आर्थिक ससेहोलपट सुरू आहे. अशा व्यावसायिकांना शासनाने या ना त्या मार्गाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी समविचारी मंचचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, राज्य चिटणीस विनय माळी, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, युवा प्रमुख नीलेश आखाडे आदींनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:51 PM 05-Nov-20