मुंबई : ‘माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार’ अशी चिट्ठी लिहित जळगावात वाहक म्हणून कार्यरत असलेले एसटी मनोज चौधरी यांच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी ठाकरे सरकारविरोधात आता टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारविरोधात टीकास्र सोडलं आहे. “जर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीची अटक होऊ शकते तर एसटीचे वाहक मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणी बेशरम ठाकरे सरकारमधील परिवहनमंत्री अनिल परबना का अटक करत नाही? मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाही जबाबदार धरावे’, असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:11 PM 09-Nov-20