नागपूर : लॉकडाऊनच्या काळातील विजेची बिलं माफ केली जाणार नाहीत, असे सांगत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सामान्यांना शॉक दिल्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नवे वक्तव्य करून संभ्रम आणखीनच वाढवला आहे. ऊर्जा विभागाच्या निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल. लोकांवर अन्याय झाला असेल तर चर्चा होणे आवश्यक आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यामुळे आता जनतेचा रोष टाळण्यासाठी महाविकासआघाडी सरकार वीज बिल कमी करण्याचा निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:29 PM 18-Nov-20