रत्नागिरी : लॉकडाऊन काळातील वीज बिलांमध्ये सवलत देण्याच्या आश्वासनावरून शासनाने घुमजाव केले. कोणतीही सवलत न देता वीज बिल वसूल केले जाणार, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्याने वीज ग्राहकांना मोठा ‘शॉक’ बसला आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांमध्ये 55 हजार 845 ग्राहकांनी बिल भरलेलेच नाही. त्यामुळे महावितरणची थकबाकी 33 कोटी 75 लाख 65 हजारवर पोचली असून एकूण थकबाकी 81 कोटी 31 लाखावर गेली आहे.
जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात एकही बिल न भरणार्या ग्राहकांची विभागनिहाय थकबाकी अशी : चिपळूण विभागात गेल्या आठ महिन्यांमधील 15 हजार 719 ग्राहकांचे 10 कोटी 1 लाख 29. खेड विभागात 16 हजार 4 हजार ग्राहकांचे 9 कोटी 16 लाख तर रत्नागिरी विभागात 23 हजार 708 ग्राहकांचे 14 कोटी 59 लाख 66 हजार असे एकूण 55 हजार 845 ग्राहकांची 33 कोटी 75 लाख 65 हजार. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने हप्त्यांची सवलत, ग्राहकांना पत्र पाठविणे, भेटीगाटी सुरू आहेत. बिल न भरल्यास गरज भासल्यास वीज जोडणी तोडण्याचा इशारा दिला आहे.
एकूण थकबाकीदार 1 लाख 52 हजार 27 घरगुती, वाणिज्य आणि लघुउद्योजकांचीही मोठी थकबाकी आहे. यामध्ये चिपळूण विभागातील 41 हजार 85 ग्राहकांची 22 कोटी 25 लाख 68 हजार थकबाकी आहे. खेडची 41 हजार 187 ग्राहकांचे 22 कोटी 12 लाख 31 हजार थकीत आहेत. रत्नागिरी विभागातील 69 हजार 782 ग्राहकांचे 36 कोटी 93 लाख 1 हजार थकबाकी आहे. एकूण 1 लाख 52 हजार 27 ग्राहकांकडून 81 कोटी 31 लाख 30 हजार थकबाकी आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:33 PM 19-Nov-20