ब्रेकिंग : मालगुंड समुद्रात तीन पर्यटक बुडाले; दोघांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू

0

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड समुद्रकिनारी आलेले तीन पर्यटक बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. बुडालेल्या तीनपैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. बुडालेले तिघेजण मुंबई येथील असल्याची माहिती पुढे आली आहे.

दिवाळी सुट्टीत हे पर्यटक पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे दाखल झाले होते. शनिवारी सकाळी हे तिघेजण मालगुंड समुद्रकिनारी फिरण्या करिता गेले होते. समुद्रात आंघोळी करिता गेले असता तिघेजण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:07 PM 21-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here