रत्नागिरी : कोरोनाकाळात बंद पडलेले वॉटर स्पोर्टस सुरू व्हावे यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू होते. त्याला जिल्हाधिकार्यांनी मंजुरी दिली. मात्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकार्यांनी वॉटर स्पोर्टसला परवानगी नाकारल्याने नवा वाद सुरू झाला आहे. यावर ना. सामंत यांनी मेरिटाईम बोर्डाच्या अधिकार्यांची कानउघाडणी केली आहे. मुंबईत बसून रत्नागिरीत काय सुरू करावे आणि काय सुरू करू नये हे मेरिटाईम बोर्डाच्या अधिकार्यांनी ठरवू नये असे खडे बोल ना. सामंत यांनी सुनावले आहेत. जिल्ह्यातील वॉटर स्पोर्टसला घातलेली बंदी लवकरच उठवली जाईल, अशी स्पष्टोक्ती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:02 AM 09-Dec-20