टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर टी 20 मालिकेत 2-1 च्या फरकाने विजय मिळवला. या टी 20 मालिकेनंतर दोन्ही संघात कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे.17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. यामुळे टीम इंडियाला उर्वरित सामन्यांमध्ये विराटची उणीव भासेल, असं टीम इंडियाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर म्हणाला.“विराट पहिल्या सामन्यानंतर भारतात परतेल. त्यामुळे भारतीय संघाला विराटची उणीव भासेल. तसेच विराटची जागा घेणाऱ्या अर्थात नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या खेळाडूसाठी ही सुवर्णसंधी असेल”, असं सचिन म्हणाला. उर्वरित 3 सामन्यांसाठी अजिंक्य रहाणेला कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते. “टीम इंडियाचे सर्व खेळाडू दमदार आहेत. यामुळे टीम इंडियाला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिका जिंकण्यास मदत मिळू शकते”, असा आशावादही सचिनने व्यक्त केला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:48 PM 10-Dec-20