🔳 धुरामुळे कोरोना वाढण्याची भीती
➡ रत्नागिरी : शहरातील प्रवेशद्वार अर्थात साळवी स्टॉप येथील परिसरात असणाऱ्या डम्पिंग ग्राउंड वरील कचरा जाळल्यामूळे सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. येणाऱ्या पर्यटकांना क्षणभर हे धुके वाटत आहे मात्र याची जाणीव होताच प्रत्येकाला पुढील धोका कळत आहे. दिल्ली सारख्या ठिकाणी तर हवेतील प्रदूषणामुळेच पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. साळवी स्टॉप येथील प्रचंड धुरामुळे परिसरातील नागरिकांना देखील कोरोनाचा धोका असल्याचे तज्ञ सांगत आहेत. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांतून होता आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:54 PM 28-Dec-20