पुण्याकडे राज्याची तिजोरी आहे, त्यामुळे आता चिंता करण्याची गरज नाही : फडणवीस

0

पुणे : पुणे व पिंपरी शहराची वाढ झपाट्याने होत आहे. त्यात महापालिकेत नव्याने २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहराच्या गरजा देखील वाढणार आहेत. मेट्रो, पिण्याचे पाणी, वाहतूक, उदयॊग धंदे, आरोग्य यांचा समावेश आहे. परंतू, पुण्याचे प्रश्न मार्गी लावताना आता चिंता करायची गरज नाही. कारण राज्याची तिजोरीच पुण्याकडे आहे, अशी मिश्किल टिपण्णी राज्याचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:09 PM 01-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here