मुंबई : औरंगाबाद नामांतराचा वाद शिगेला पोहोचला आहे. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर व्हावे या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं असताना आता मनसेनंही या वादात उडी घेतली आहे. मनसेनं या मुद्द्यावरून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. ‘जो पर्यंत सत्तेची लाचारी शिवसेना सोडत नाही तोपर्यंत नामांतर करू शकत नाहीत. सत्तेत असताना शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. या मुद्द्याला काँग्रेस पाठिंबा देणार नाही. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय शिवसेनेला सत्तेत राहाणं जमणार नाही. त्यामुळे आता शिवसेनेनं ठरवायचं आहे. लाचारी करायची की अस्मिता बाळगून औरंगाबादचं संभाजीनगर नाव करायचं’, अशी जहरी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:25 PM 07-Jan-21