मुंबई : बर्ड फ्लूच्या वाढत्या फैलावामुळे देशभरात भीती पसरली आहे. अनेक राज्यांमध्ये कोंबड्यांची कत्तल केली जात आहे. मात्र महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याची पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी ग्वाही दिली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमुने, विष्ठेचे नमुने तसेच रक्तजल नमुने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे. राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबविण्यात येत असून पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे सुनील केदार यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:05 PM 08-Jan-21