रत्नागिरी : कोरोना लसीच्या वितरणाचा खर्च केंद्र सरकारने करण्याची मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यावर भाजप नेते, आमदार प्रसाद लाड यांनी टीका केली आहे. राज्य हम चलायेंगे, मलाई भी हम खायेंगे, असं सध्या आघाडी सरकारचं सुरू आहे. या सरकारने लसीच्या वितरणाचा खर्च केंद्राने करण्याची मागणी करण्यापेक्षा राज्यातील आघाडी सरकारच केंद्रात उचलून ठेवावं, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे. रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसाद लाड यांनी हा टोला लगावला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 09-Jan-21