ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी १६०० शस्त्रे घेतली ताब्यात

0

रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील १६४८ पैकी १६०० शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. काही कारणास्तव ताब्यात न आलेली शस्त्रे येत्या काही दिवसांत ताब्यात घेतली जाणार आहेत. जिल्ह्यात दि.१५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान होणार आहे. निवडणूक प्रचारासह मतदानाच्या वेळी शस्त्राचा धाक दाखवून मतदारांना भयभीत किंवा प्रभावित केले जाऊ नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार परवानाधारक शस्त्र पोलिस स्थानकात जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात एकूण १६४८ परवाना धारक शस्त्रे आहेत. त्यातील १६०० जणांनी त्या-त्या अधिकार क्षेत्रातील पोलिस स्थानकात शस्त्रे जमा केली आहेत. त्यामध्ये ५५५ पैकी ५२२ आत्मसंरक्षण, १०९३ पैकी १०७८ शेती संरक्षण शस्त्रांचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:36 AM 13-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here