”ऑपरेशन लोट्स’ झाल्यास राज्यात भाजप राहणार नाही’

0

◼️ ‘देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत, पण…’

मुंबई : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे माझे चांगले मित्र आहेत, पण ते काहीही बोलतात. त्यांचं बोलणं हीच त्यांची फक्त खासियत आहे’ अशा शब्दांत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. तसंच, जर ऑपरेशन लोट्स झाले तर राज्यात भाजपचा राहणार नाही’ अशी टीकाही पटोले यांनी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मित्र आहेत पण ते काहीही बोलतात, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भविष्यात भाजप पक्ष नावालाही उरणार नाही, असा विश्वासाही त्यांनी यावेळी व्यक्त केला. फडणवीस यांनी सत्तांतरांचे संकेत देत फासा आम्हीच पलटणार, असे विधान ५ फेब्रुवारीला केले होते. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी वरील विधान केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:02 PM 08-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here